Pm kisan yojana: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. त्याअंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
जे शेतकरी नोंदणीकृत जमिनीवर शेती करत आहेत तेच पीएम किसान योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. याशिवाय जे शेतकरी आपल्या उत्पन्नाची माहिती देत कर भरत आहेत ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाहीत. वास्तविक, या योजनेचा लाभ घेण्याबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक संभ्रम आहेत.Pm kisan yojana
वडिलोपार्जित जमिनीचाही फायदा होणार नाही
जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन त्याच्या वडिलांच्या किंवा पालकांच्या नावावर असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणूनच पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 13 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले असून आता हे शेतकरी 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता पुढील आठवड्यात कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येईल.Pm kisan yojana
Pm kisan yojana: दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्यांना फायदा होईल का?
शेतकरी जर दुसऱ्याच्या नावावर असलेली शेती करत असेल तर त्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल का? याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहुयात.. दुसऱ्याच्या नावावर असलेली शेती एखादा शेतकरी करत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमिनीची नोंद आहे त्यालाच मिळतो.
याशिवाय तुमच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन तुमच्या नावावर नोंदणीकृत असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि ते दुसऱ्यांच्या जमिनीवर शेती करतात. अशा परिस्थितीत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.