Effects of water: जास्त प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या दुष्परिणाम…!!

Effects of water: पाणी आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावते, अन्नाशिवाय आपण एक दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. मानवी शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. असे मानले जाते की, पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, म्हणून आपण भरपूर पाणी पितो.

 

आपल्याला निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाण आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते आणि जर आपण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न आपण केला तर ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

काही दिवसापूर्वी अमेरिकेत एका 35 वर्षीय महिलेचा जास्त पाणी प्यायल्यामुळे मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कुटुंबासह सुट्टीवर गेली होती. यादरम्यान तिला खूप तहान लागली आणि तिने 20 मिनिटांत सुमारे चार बाटल्या पाणी पिल्या, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूचे कारण पाण्यातील विषबाधा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, आजच्या लेखात आपण जास्त दारू पिण्याचे तोटे जाणून घेणार आहोत.Effects of water

 

 

Effects of water: जास्त पाणी पिण्याचे तोटे :-

पाण्याच्या विषबाधाला वैद्यकीय भाषेत हायपोनेट्रेमिया म्हणतात. जेव्हा तुम्ही कमी वेळेत जास्त पाणी पिता तेव्हा अशी समस्या उद्भवते. अशावेळी किडनीमध्ये जास्त पाणी साचते. खरं तर, जास्त पाणी पिण्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी असंतुलित होऊ शकते, ही स्थिती पाण्याची विषारीता म्हणून ओळखली जाते. शरीराच्या कार्यासाठी सोडियम आवश्यक आहे. हे शरीराच्या पेशींच्या आत आणि बाहेरील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते.

पाण्याच्या विषबाधाची लक्षणे ओळखणे फार महत्वाचे आहे. सुरुवातीच्या लक्षणांमुळे तुम्हाला सामान्यतः अस्वस्थ वाटू शकते. मळमळ, स्नायू पेटके, डोकेदुखी यांसारखी लक्षणे जाणवू शकतात, जर ही लक्षणे तुमच्या शरीरात झपाट्याने वाढली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कमी वेळेत जास्त पाणी पिल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तथापि, पाणी विषबाधा इतर कारणे देखील असू शकतात.ज्यामध्ये आरोग्य समस्या, औषधे आणि अस्वस्थ जीवनशैलीच्या सवयींमुळेही ही समस्या उद्भवू शकते.याशिवाय उन्हात बाहेर पडल्यानंतर लगेच जास्त पाणी पिणेही धोकादायक ठरू शकते. यामुळे पाणी विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पाणी हळूहळू पिणे केव्हाही चांगले.

पाण्याची विषबाधा कशी टाळायची?

उन्हाळ्यात लोकांना खूप तहान लागते. अशा परिस्थितीत ते आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पितात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. कमी कालावधीत जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. म्हणून काळजीपूर्वक पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त पाणी पिल्यास आरोग्यावर धोका येऊ शकतो. म्हणून कधीही पाणी पिता वेळेस  हळुवारपणे, आणि सावधान म्हणून पाणी प्या जास्त पाणी पिल्यास तुमच्या जीव आहे जाऊ शकतो.Effects of water

Leave a Comment